पीपल्स हेल्पलाईन,भारतीय जनसंसदेची ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहिम

पीपल्स हेल्पलाईन,भारतीय जनसंसदेची ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहिम 

सामाजिक अवमूल्यन करणारी आडनावे कायद्याने बदलण्याचा अधिकार : अ‍ॅड. कारभारी गवळी

वेब टीम नगर :  समाजात व्यक्तीच्या आडनावावरुन जात समजते व सामाजिक अमुल्यन होत असताना पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहिम जारी करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

भारतातील वर्ण आणि जाती व्यवस्थेमुळे माणसाचे सामाजिक अमुल्यन होते. याला व्यक्तीचे आडनाव कारणीभूत ठरते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही वर्ण आणि जातीव्यवस्था मोठ्या प्रमाणावर टिकून आहे. जातिव्यवस्थेला खतपाणी घालण्यासाठी भारतातील राजकारणी कारणीभूत ठरतात. त्याशिवाय दरवर्षी लाखो लोक जातीवर आधारित आरक्षण मागण्यांसाठी मोर्चे आंदोलने करतात. एकंदरीत जातव्यवस्था मोडीत काढण्याएवजी आज देखील त्या प्रबळ ठरत आहे. राजकारण्यांनी जात व्यवस्था मोडीत काढण्यासाठी कायदे करण्याची मानसिक तयारी दाखवलेली नाही.

जातिव्यवस्थेचे मुळ हे नॉन जेनेटिक इन्फर्मेशन तंत्रामध्ये आहे. ज्या समाजात मुला मुलींचे संगोपन होते, त्याशिवाय आजूबाजूचा परिसर या सर्व बाबी जात संस्था बळकट करण्यास कारणीभूत ठरतात. जातीचे मुळं समाजाच्या इतर घटकांमध्ये जेवढे आहे, त्याच्या शेकडो पटीने व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये असल्याचे मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.व्यक्तीची जात ही स्पष्ट रीतीने त्यांच्या आडनावातून स्पष्ट होते. काही आडनाव व्यक्तीचे सामाजिक अवमूल्यन करतात किंवा त्यातून जातीचा दुर्गंध हा इतरत्र पसरतो. याच कारणासाठी संघटनेने ऑपरेशन सरनेम सर्जरी मोहीम हाती घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या आडनावामुळे जात स्पष्ट होते व मानवी सामाजिक अवमूल्यन होते. अशी सर्व आडनावे कायद्याने बदलण्याचा अधिकार व्यक्तीला आहे.  एक चळवळीद्वारे अशी आडनावे सोयीस्कररितीने बदलता येणार आहे. त्यासाठी एकाच वेळेला सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्धी, रेशन कार्डावर आडनाव नोंदीचा बदल, जातीच्या दाखल्यावर आडनाव बदल अशा सर्व गोष्टी कायद्याने करता येणार आहेत. विज्ञानाच्या तंत्रज्ञानाने प्लास्टिक सर्जरी करून माणसाच्या शरीरावरील विद्रूप भाग बाजूला करून नव्याने सौंदर्य निर्माण करता येते. या तत्त्वावर ऑपरेशन सरनेम सर्जरी राबवली जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, पै. नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.(फोटो- भारतीय )_

Post a Comment

0 Comments