जनतेचा कल आजही रोखीने व्यवहार करण्या कडे

जनतेचा कल आजही रोखीने व्यवहार करण्या कडे 

वेब टीम नवी दिल्ली : रोख रक्कम ही देशातील सर्वाधिक पसंतीची पद्धत आहे आणि त्याचा वापर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 8 ऑक्टोबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात (14 दिवसांचा कालावधी) लोकांकडे असलेली रोकड वाढून 28.30 लाख कोटी रुपये झाली आहे. नोटाबंदीपूर्वी 4 नोव्हेंबर 2016 रोजी ते 17.97 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच सुमारे पाच वर्षांत लोकांकडे असलेली रोकड ५७.४८ टक्क्यांनी वाढली आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. नंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. नोटाबंदीनंतर, सरकार सिस्टममधून रोख रक्कम कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंटला सतत प्रोत्साहन देत आहे. UPI सारख्या पेमेंट पद्धतींचा प्रचार केला जात आहे. मात्र तरीही रोखीचा वापर कमी होताना दिसत नाही.

लॉकडाऊनमध्ये लोकांकडे रोख रक्कम वाढली

एका मीडिया रिपोर्टनुसार, सिस्टममध्ये रोख रक्कम वाढण्याचे एक कारण म्हणजे कोरोना महामारी. 2020 मध्ये, जेव्हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले, तेव्हा लोकांनी त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी रोख रक्कम जमा करण्यास सुरुवात केली.

सणासुदीच्या काळात रोख रकमेला मोठी मागणी असते

सणासुदीच्या काळात, रोख रकमेची मागणी जास्त राहते कारण मोठ्या संख्येने व्यापारी अजूनही  व्यवहारांसाठी रोख पेमेंटवर अवलंबून असतात. सुमारे 15 कोटी लोकांचे बँक खाते नाही हे देखील एक कारण आहे.

Post a Comment

0 Comments