२६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर
शेतकरी, कामगारांचा मोर्चा
देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीची पुढाकार
टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने हे हक्क आणि अधिकार अबाधित ठेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि शेतकरी विरोधी तीन कायदे, शिक्षक, पालक विरोधी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करणे, जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागू करणे आदी विविध मागण्यांकरित हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या बंद मध्ये प्रत्येक संघटनेशी संलग्न युनियन, शेतकरी, कामगार, सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, हमाल-मापाडी संघटना सहभागी होणार आहेत.
शहरात गुरुवार दि.२६ नोव्हेंबरला सर्व कामकाज बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ वाजता एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे बैठकित ठरविण्यात आले. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्तरातून केंद्र सरकार विरोधात असंतोष असून, सर्वच संघटना उत्सफुर्तपणे या बंद मध्ये सहभागी होणार आहे. अनेक संघटनांनी शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीला पाठिंबा दिला आहे.
0 Comments