घरकुल वंचितांनी धनत्रयोदशी ही वनत्रयोदशी म्हणून केली साजरी

घरकुल वंचितांनी धनत्रयोदशी ही वनत्रयोदशी म्हणून केली साजरी

अनामप्रेम संस्थेत दिव्यांग मुलांसह साजरी केली दिवाळी

प्रस्तावित गृह प्रकल्पाच्या परिसरात बियांचा तळीभांडार

वेब टीम नगर - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने दिवाळी प्रदुषणमुक्ती व वन हीच खरी धनसंपदा असल्याचा संदेश देत शहरातील घरकुल वंचितांनी निंबळक येथे होत असलेल्या प्रस्तावित वनश्री बलभिम (आण्णा) डोके नगरच्या गृह प्रकल्पाच्या परिसरात धनत्रयोदशी ही वनत्रयोदशी म्हणून साजरी केली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांच्या हस्ते बियांचा तळीभांडार करण्यात आला. तर स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेत दिव्यांग मुलांसह दिवाळीचा पहिला दिवा प्रज्वलीत करुन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.

अनामप्रेम संस्थेत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांना घरकुल वंचितांचे प्रश्‍न सोडविण्याचे साकडे घालून त्यांना पावीर हमी लोककर्मा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, सामाजिक कार्यकर्ते एस. नाथन, अनामप्रेमचे अजीत कुलकर्णी, अशोक सब्बन, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, पोपट भोसले, शहादेव चव्हाण, जगन्नाथ भोसले, शितल पगारे, वैशाली शिंदे, शोभा दगडे, शिला कदम, संतोष लोंढे, स्वाती कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी आदींसह घरकुल वंचित उपस्थित होते.  


 कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरणासाठी काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, पद्मश्री पोपट पवार, सिनेअभिनेते अमीर खान, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी पर्यावरणसंवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावली असताना त्यांना मानवंदना देण्यात आली. माधवराव लामखडे यांनी घरकुल वंचितांचे गृह प्रकल्प उभे राहत असताना त्यांना वीज, रस्ते व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका राहणार आहे. घरकुल वंचितांचे घरांचे स्वप्न या प्रकल्पाच्या माध्यमातून पुर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांची दिवाळी गोड करण्यासाठी संघटनेच्या वतीने अनामप्रेम संस्थेत कार्यक्रम घेण्यात आला आहे. पर्यावरण हीच खरी धनसंपदा असल्याने त्याचे पूजन होणे गरजेचे आहे. घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना ८० हजार रुपयात १ गुंठा जमीन मिळणार आहे. तर या योजनेस जागा देणार्‍या जागा मालक शेतकरींचा देखील खडकाळ पड जमीनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होणार आहे. घरे उभी करत असताना वनधनराईची शपथ घेऊन वृक्षरोपण व संवर्धनाची जबाबदारी देखील घरकुल वंचित पार पाडणार असल्याचे मत अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांनी संघटनेने घरकुल वंचितांचे आश्रू पुसण्याचे काम केले आहे. त्यांच्या पुढाकारानेच घरकुल वंचितांचा मोठा प्रकल्प साकारला जात असल्याचे सांगितले. 



Post a Comment

0 Comments