शत्रू राष्ट्रांच्या हालचालीवर आता भारताच्या तिसऱ्या डोळ्याची नजर

शत्रू राष्ट्रांच्या हालचालीवर आता 

भारताच्या तिसऱ्या डोळ्याची नजर 

इएसओ-०१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

चीन व पाकिस्तानच्या कारवायांवर लक्ष ठेवणे होणार शक्य 

वेब टीम श्रीहरीकोटा - इसरो ने  EOS-01 (अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट-०१)चे आज यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आजचे इसरोचे हे प्रक्षेपण या वर्षीचे पहिलेच प्रक्षेपण आहे.श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून PSLV-C49 रॉकेटच्या माध्यमातून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहा सोबत विदेशी उपग्रहांचे देखील प्रक्षेपण करण्यात आले आहे.उपग्रहांचे थेट प्रक्षेपण इसरोच्या या प्रक्षेपणानंतर संबंधित देशांनी इसरोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे . 

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कृत्यांवर तसेच देशातील अन्य काही ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी हाय रिझोल्यूशनची सुविधा असणाऱ्या उपग्रहाची देशाला गरज होती.

EOS-01 उपग्रह हा शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यायसाठी उपयुक्त ठरेल. याच्या सिंथेटिक ऍपर्चर रडाराच्या माध्य़मातून दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही आणि कोणत्याही हंगामात शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हा उपग्रह ढगांच्या अडथळ्यांना भेदून हाय रिझोल्युशनचे फोटो घ्यायला सक्षम आहे. त्यामुळे लष्कराच्या क्षमतेत वाढ होणार आहे. पाकिस्तान सोबत आता चीनच्या कुरापतीही भारतासाठी डोकेदुखी ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा उपग्रह अनेक अर्थानी फायदेशीर ठरणार आहे. भारत-चीनच्या सीमेवर नजर ठेवण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग चांगल्या पध्दतीने होऊ शकतो. त्याचबरोबर कृषी, वने, भूविज्ञान या क्षेत्रात तसेच किनारी भागातील सुरक्षा मजबुत करण्यासाठीही होणार आहे.

आज प्रक्षेपित करण्यात आलेला उपग्रह हा या सीरीजमधील पाचवा उपग्रह आहे. हा उपग्रह याआधी रिसॅट म्हणून ओळखला जायचा. यापुर्वीचा चौथा उपग्रह गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.

इसरोच्या अध्यक्ष के सिवन यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळातही सुरक्षेचे सर्व नियम पाळून आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता इसरोच्या टीमने हे यश संपादन केलंय. हे मिशन इस्त्रोसाठी खूप महत्वाचे आहे. इसरोच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येत नाही. प्रत्येकाला लॅबमध्ये उपस्थित रहावे लागते. अशा परिस्थितीतही कर्मचारी काम करत आहेत ही कौतुकाची बाब आहे.

Post a Comment

0 Comments