मुंबईत भीषण अग्नीतांडव
एकाचा होरपळून मृत्यू ,तीन जण गंभीर
मुंबई : दक्षिण मुंबईतील कप परेड परिसरातील मच्छीमार नगर परिसरात आज (20 ऑक्टोबर) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका चाळीस भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एका पंधरा वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना जवळच्याच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे . कप परेड परिसरातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील एका चाळीला सकाळी आग लागली.
या आगीची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटापर्यंत अग्निशमन दलाने ही आग विझवली . चाळीतील एका घराच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती काही मिनिटात आग चाळीतील काही घरांमध्ये पसरली, मात्र अग्नीशमनदलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला. तर तीन जण होरपळले आहेत.
आगीचं कारण काय?
ही आग फटाक्यांमुळे लागली असावी असा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्राथमिक तपासानंतर सांगण्यात आलं की शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी पोलीस , अग्नीशमनदल या प्रकरणाचा तपास करीत आहे . पोलिस तपासाअंती आगीचं खरं कारण समोर येईल, मात्र या आगीच्या घटनेमुळे सदर चाळीतील लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. तसंच कप परेड आसपासच्या परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.



0 Comments