३० वेळा लग्न करून तिने घातला अनेकांना गंडा

३० वेळा लग्न करून तिने घातला अनेकांना गंडा 

वेब टीम नवी दिल्ली :  देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत.  अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे . एका तरुणीने एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीस जणांबरोबर लग्न करून फसवणूक केली आहे.  हा फसवणुकीचा प्रकार उजेडात आला आहे . लग्नाच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊन फरार झालेल्या या तरुणीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे . 

या प्रकरणी तिला डूंगरपुर जिल्ह्यातील सागवाडा पोलिसांनी अटक केली आहे तरुणीचं नाव असून चौकशी  लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे . सीता चौधरी असं तिचं खरं नाव आहे .  पोलीस निरीक्षक सुरेंद्र सोळंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 डिसेंबर 2019 ला जोधपूर येथील रहिवासी प्रकाशचंद्र यांनी एक तक्रार दाखल केली होती.  त्यांनी सांगितले की जुलै 2019 मध्ये मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी ठाकूर सोबत लग्न लावून दिले होते.  या बदल्यात त्याच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते . लग्नानंतर सात दिवस राहिल्यानंतर ती त्याच्यासोबत जबलपूर येथे गेली.  परत येताना रिनाने दुसऱ्या लोकांना सोबत घेऊन त्याला मारहाणही केली, आणि आपल्या साथीदारांसह ती पळून गेली . परेश जैन आणि रीनाने आपले फोन नंबर बदलले तसेच त्याचे  पैसे देखील दिले नाहीत असे पोलीस तपासादरम्यान असे आढळून आले आहे.  

 रीना ठाकुर चे खरे नाव सीता चौधरी आहे.  ती जबलपूर येथे गुड्डू उर्फ  पूजा वर्मा यांच्यासोबत काम करते . गुड्डी ने नववधूची टोळी चालवली आहे . काही मुलींची बनावट नाव व पत्ता आधार कार्ड आणि अन्य कागदपत्र तयार करून ठेवले आहेत . अनेक राज्यांमध्ये यांच्या माध्यमातून बनावट लग्न करून त्याच्यापासून पैसे आणि सोने चांदी दागिने घेत होती . त्यानंतर ती फरार होत होती.  सीटस चौधरी बर्याच  पासून तिच्या सोबत राहत होती.  पोलिसांनी तपासादरम्यान पूजा बर्मन चा नंबर काढला.  त्यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रतापने   आपला फोटो पाठवून लग्न करण्याबाबत तिला सांगितले.  लग्नासाठी मुलगी दाखवायला पाच हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर पूजाने कॉन्स्टेबलला आठ ते दहा मुलींचे फोटो पाठवले त्यात  रीनाचा   फोटो होता.  पोलिसांनी रीनाला लगेच ओळखले . यानंतर सापळा  रचत रीना  पसंत असल्याचे सांगत तिच्यासोबत लग्न करण्याचे सांगितले. 

 पूजाने कॉन्स्टेबल ला समदारिया मॉल  जवळ ऍडव्हान्स मध्ये 50 हजार रुपये घेऊन येणे बाबत सांगितले.  त्यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रताप आणि त्याच्यासोबत कॉन्स्टेबल भुपेंद्रसिंग आणि त्याचे मित्र बनून गेले तिकडे ठाकूरला घेऊन आली.  तिथे तिने तिचे नाव काजल चौधरी असे सांगितले. याच वेळी रीना चौधरी उर्फ काजलचौधरी उर्फ सीता चौधरी हिला  पोलिसांनी अटक केली . आतापर्यंत ३० लग्ने केल्याचे तिने कबूल केले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे


Post a Comment

0 Comments