अहमदनगर रेल्वे स्थानकाची जंक्शन वाटचाल : हरजितसिंह वाधवा

अहमदनगर रेल्वे स्थानकाची जंक्शन कडे  वाटचाल : हरजितसिंह वाधवा    

वेब टीम नगर : अहमदनगर रेल्वे स्थानकाची जंक्शनच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तथा सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य हरजितसिंह वाधवा यांनी दिली. 

जिल्ह्यात मध्य रेल्वे अंतर्गत रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यासाठी ५०० कोटी जाहीर करण्यात आले असून नुकत्याच जाहीर झालेल्या २०२२-२३ च्या बजेट मध्ये रेल्वे विभागाने हि घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्ट्टीकोनातून महत्वाचा विषय असलेल्या अहमदनगर-बीड -परळी रेल्वे लाईन हि क्रमांक २ वर असून त्याकरिता २०० कोटी रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत.३६७ कोटी रुपये डिपॉझिट या रीतीने अहमदनगर - बीड -परळी करीत बजेट मध्ये असे एकूण ५६७ कोटी रुपये तर दौंड - मनमाड दुपदरी करणासाठी ५०० कोते रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत. 

पुणे - नाशिक नवीन रेल्वे लाईन २ वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्या करीत यावर्षी कुठलाही निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे संगमनेरकरांना यावर्षी रेल्वेचे कार्य सुरू होणार असल्याचे पुणतांबा - रोटेगाव या रेल्वे लाईन करताहि पैसे देण्यात आले नसल्याचे वाधवा यांनी सांगितले.यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात ट्रॅक च्या मजबुती करीता पैसे देण्यात आले असून नगर - बीड - परळीला अष्टीच्या पुढे अधिक वेगाने चालना देण्यात येणार आहे. तसेच आष्टी रेल्वे सुरु झाल्याने अहमदनगर रेल्वे स्थानक जंक्शन होणार आहे.   

Post a Comment

0 Comments