“२०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम”:मणिशंकर अय्यर

“२०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम”:मणिशंकर अय्यर 

वेब टीम नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य भीक असून २०१४ मध्ये देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं अशा आशयाचं हे विधान होतं. त्याचे पडसाद अजूनही उमटत असताना आता काँग्रेस नेत्यानेही असंच वादग्रस्त विधान केलं आहे. २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम झाला आहे, असा उल्लेख या काँग्रेस नेत्याने केलं आहे.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात अय्यर म्हणाले की, २०१४ पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत रशिया संबंधांचा उल्लेख करत आपलं विधान सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, “गेल्या 7 वर्षात आपण पाहत आहोत की, पक्षांतराची कोणतीही चर्चा होत नाही. शांततेची चर्चा नाही. ते अमेरिकन लोकांचे गुलाम बनून बसले आहेत आणि ते म्हणतात चीनपासून वाचलं पाहिजे. भारत-रशियाचे संबंध वर्षानुवर्षे जुने आहेत, पण मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे, असे अय्यर सांगत होते. मणिशंकर अय्यर म्हणाले की, २०१४ पर्यंत रशियाशी आमचे जे संबंध होते, ते खूपच कमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments