महाराष्ट्राला दिड कोटी जादा लसी देण्याची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्राला दिड कोटी जादा लसी देण्याची केंद्राकडे मागणी 

वेब टीम मुंबई : या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी २ जुलै रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहून महाराष्ट्राला दीड कोटी जादा लसीचे डोस देण्याची मागणी केली आहे. या पत्रात डॉ प्रदीप व्यास म्हणतात, केंद्राने जुलै महिन्यासाठी १ कोटी १५ लाख डोस देणार असल्याचे नमूद केले आहे. केंद्र सरकारनेच मागे एका बैठकीत राज्याच्या लस नियोजनाचे सादरीकरण करायला सांगितले होते, तेव्हा ९ लाख लसीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले होते. आम्ही सध्या १० ते १२ लसीकरण रोज करू शकतो तसेच २६ जून या एकाच दिवशी ७ लाख ३८ हजार लोकांचे लसीकरण करून आमची नियोजनबद्ध लसीकरणाची क्षमता दाखवून दिली आहे. 

केंद्राकडून जुलैमध्ये साधारण रोज ३ लाख ७० हजार लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत तर आमची क्षमता व गरज लक्षात घेऊन केंद्राने आम्हाला जादाचे दीड कोटी डोस द्यावे, अशी मागणी डॉ व्यास यांनी आपल्या पत्रात केली आहे. त्याचप्रमाणे केंद्राने जादा लसीचे डोस दिल्यास नियोजित वेळेत व लस वाया न जाता लसीकरण केले जाईल, असेही आश्वासन डॉ व्यास यांनी दिले आहे.

महाराष्ट्राची १२ कोटी लोकसंख्या लक्षात घेता २४ कोटी डोसची गरज असून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ३ कोटी ३० लाख एवढी आहे. केंद्राकडून वेळेत लस पुरवठा होत नसल्याने गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागातील लस केंद्र बंद करावी लागली होती. अशावेळी लोकांची लसीकरणासाठी भटकंती होऊन त्यांचा रोष राज्य सरकारला सहन करावा लागतो. मात्र केंद्राने लस पुरवठ्याची स्वतः ची जबाबदारी झटकत राज्यांनी योग्य नियोजन करावे असा सल्ला देत लस समस्येला राज्य सरकारेच जबाबदार असल्याची टीका केली आहे. या सर्वाचा विचार करता महाराष्ट्राला जास्तीतजास्त लसीचे डोस मिळणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments