वेळीच लसीकरण केले असते तर संसर्ग वाढला नसता

वेळीच लसीकरण केले असते तर संसर्ग वाढला नसता 

वेब टीम पंढरपूर : केंद्राने सगळ्या नागरिकांचे वेळीच लसीकरण केले असते तर आज देशात कोरोनाचा संसर्ग वाढला नसता. केंद्र सरकारवरच सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहे. तसेच देशातले नागरिक सोडून पाकिस्तानला लस देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाक धार्जिणे असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.  पेट्रोल मधून रस्ते विकासासाठी प्रती लिटर 14 रुपये व शेतकरी विकासासाठी 5 रुपये कपात करणारे मोदी सरकार देशाला विकत असून आता तर देश विकायला काढल्याचाही आरोप त्यांनी केला. 

लॉकडाऊन करताना जे घटक मदतीपासून सुटलेले आहेत अशा घटकांना पण मदत करा असे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना लिहले आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रचारासाठी आज नाना पटोले पंढरपुरात आले होते. यावेळी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे , उमेदवार भगीरथ भालके, डॉ धवलसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . 

राजू शेट्टी सरकारवर टीका करत असले तरी ते डबल ढोलकी आहेत असा टोला त्यांनी शेट्टी यांना लगावला. आज न्यायालये देखील महाराष्ट्रासारखे काम करण्याच्या सूचना भाजपशासित काही राज्यांना देत असल्याचे सांगत कोरोनाचे काम ठाकरे सरकार चांगल्या रीतीने करीत आहे . रेमडिसीवीर इंजेक्शन आणि लसी राज्याला देत नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील पटोले यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहे. फडणवीस जरी काही बोलत असले तरी तेच ओबीसी विरोधी आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. त्यांच्या मुळेच ओबीसी समाजच नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments