हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई

हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई 

 मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

वेब टीम नगर : नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधीन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली आहे. ही आग सकाळी 10 वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार. 

या प्रकरणाबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “अहमदनगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये 17 रूग्णांपैकी 7 रूग्णांना वाचवण्यात यश आलं आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. ही घटना दुर्देवी असून जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.”

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यात येण्याचे आदेश केले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.



Post a Comment

0 Comments