शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य

मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांची ग्वाही 

वेब टीम नगर : शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास मी नेहमीच प्राधान्य देतो. अवघड क्षेत्रातील शाळांबाबत अंतिम निर्णय झालेला नाही .सातपैकी तीन निकषात बसणाऱ्या शाळा अवघड क्षेत्रात सामावून घेतल्या जातील , असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले .शिक्षकनेते डॉ . संजय कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समिती व गुरुकुलच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांची भेट घेतली . कोरोनाच्या आघाडीवर शिक्षक डाटा एंट्री सारखी अनेक कामे करत आहेत .पण सेतू प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक वेळ मिळत नाही . त्यामुळे शिक्षकांना देण्यात येणारी डाटा एन्ट्रीसारखी कामे काढून घ्यावीत , वरिष्ठ वेतनश्रेणीचे पुर्ण जिल्ह्याची सुमारे चारशे पन्नास प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत, वैद्यकिय बिले व भविष्य निर्वाह निधीसाठी निधी मंजूर करून सर्व प्रकरणांची पुर्तता करावी इत्यादी प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झाली . निधीबाबत असमर्थता व्यक्त करुन इतर सर्व प्रलंबीत प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी स्वतंत्रपणे दिली . समिती गुरुकुलच्या शिष्टमंडळात दत्ता जाधव , मधूकर मैड , विजय महामूनी व इतर प्रतिनिधी उपस्थित होते .

 शालेय पोषण आहाराच्या दिडशे  रुपये रकमेसाठी मुले व पालकांना पाचशे ते एकहजार रुपये खर्च येत असल्याची बाब डॉ.संजय कळमकर यांनी लक्षात आणून दिली.यावर झिरो बॅलन्सने मुलांची खाती उघडा . झिरो बॅलन्सने खाते उघडण्यास नकार देणाऱ्या बँकाची नावे तात्काळ आम्हाला कळवा असे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले .



Post a Comment

0 Comments