शहरातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले

 शहरातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येऊ लागल्याने नगरचे जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे.आज नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या ६७२ इतकी असल्याने काहीसे दिलासादायक वातावरण आहे. शहरातील व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन नगर जिल्हा वासियांना करावे लागणार आहे.    

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ६७२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १८, राहता- ४८ ,श्रीरामपूर-२३ , संगमनेर - ४७, नेवासे- ४४, नगर तालुका- २० ,पाथर्डी - ५४ ,अकोले - ३१, कोपरगाव - ४५,कर्जत - ७७, पारनेर - ७१, राहुरी - ५३, भिंगार शहर- ००,शेवगाव - ४१, जामखेड - ३१, श्रीगोंदे - ५३, इतर जिल्ह्यातील - १६, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.भिंगार शहर आणि काही तालुके वगळता सर्वत्र बाधितांच्या संख्येत साधारण दुपटीने वाढ झाली आहे.  

Post a Comment

0 Comments