फेरीद्वारे विक्रीस परवानगी



कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

फेरीद्वारे विक्रीस परवानगी

            वेब टीम नगर, दि. २५ - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजी बाजारावे ठिकाणी नागरीकांची होणारी गर्दी टाळणेसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, नगर येथील फळे व भाजीपाला बाजार भरणेस दि. ३१ मार्चपर्यंत पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

            कोणतीही व्यक्ती ,संस्था,संघटना यांनी वरील  आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (४५ वे कलम  १८६०चा कायदा ) च्या  कलम १८८ नुसार दंडनिय कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे. कोव्हीड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी य त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे,  त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी  म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरुन हे आदेश जारी करण्यात आले आहे.   

Post a Comment

0 Comments