बंगळुरूमध्ये मुसळधार पावसात 2 ठार

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसात 2 ठार

दिल्लीत रिमझिम पाऊस; केरळ-आसाममध्ये अलर्ट जारी

वेब टीम बंगळुरू : येत्या चार ते पाच दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने देशाच्या अनेक भागांमध्ये वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मान्सून नैऋत्य प्रदेश, बंगालचा उपसागर आणि अंदमान सागरी भागात २ ते ३ दिवसात पोहोचू शकतो. या दरम्यान वादळ, मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात.

दुसरीकडे केरळ, आसाम आणि कर्नाटकात मान्सूनपूर्व पाऊस झाला. बेंगळुरूमध्ये अतिवृष्टीमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी दिल्लीत हलका पाऊस झाला. मात्र, उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अजूनही दिसून येत आहे. बहुतांश राज्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास आहे.

केरळच्या 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

हवामान खात्यानुसार, केरळमधील अनेक भागात चक्रीवादळामुळे बुधवारीही मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासारगोड या सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, हवामान खात्याने नुकताच जारी केलेला रेड अलर्ट मागे घेतला आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की चक्रीवादळ लक्षद्वीपहून केरळकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 बेंगळुरूच्या अनेक भागात पाणी साचले आहे

मंगळवारी संध्याकाळपासून बेंगळुरूमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बंगळुरूच्या शहरी आणि ग्रामीण भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या चार-पाच दिवसांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो.

मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार मौर्या रोडवर 4 फूट, चिकपेट, सुलतानपेट आणि नागरथपेठमध्ये 3-3 फूट पाणी भरले आहे. सिरसी सर्कल फ्लायओव्हरमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जय नगर, शिवाजी नगर, महालक्ष्मीपुरम, जेसी नगर, जेजेआर नगर आदी सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनतेचे मोठे हाल झाले.

मुसळधार पावसाचा बंगळुरू मेट्रोवरही परिणाम झाला. पर्पल लाईनवरील गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र, नंतर गाड्या सुरू झाल्या. खराब हवामानाचा परिणाम विमान कंपन्यांवरही झाला. राजमुंद्री आणि कोलकाता येथून दोन उड्डाणे चेन्नईकडे वळवावी लागली.

मौर्य रोडवर चार फूट, चिकपेट, सुलतानपेठ, नागरथपेठ प्रत्येकी तीन फूट पाणी साचले.

Post a Comment

0 Comments