वर्दी बाजूला ठेऊन दोन हात करा , मग दाखवू मनसैनिक काय आहेत ते ......

 वर्दी बाजूला ठेऊन दोन हात करा , 

मग दाखवू मनसैनिक काय आहेत  ते ...... 

वेब टीम मुंबई : परिवहन सेवेच्या उदघाटन सोहोळ्याच्यावेळी घोषणाबाजी करत आंदोलन करणाऱ्यांना दोन मनसैनिकांना  पोलिसांनी अटक केल्याची घटना विरार येथे घडली मात्र पोलिसांच्या वर्तनाबाबत मनसे गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली.वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय आहेत हे दाखवून देऊ असं आव्हानच  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलं आहे.

 वसईमध्ये पोलिसांनी कारवाई करताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसंच सरकारचे दलाल असल्यासारखे वागू नका सांगताना आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाची आठवण करुन दिली.

वसई विरार इथे एकनाथ शिंदे त्यांच्या उपस्थितीत परिवहन कामगार च्या मेळाव्यात आयुक्त आम्हाला वेळ देत नाहीत त्यांनी आम्हाला वेळ द्यावा अश्या घोषणा काही मनसैनिक देत होते. त्यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांचे बखोट धरून त्यांना अर्वाचं शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली त्यामुळे तेथील वातावरण बिघडले. 

त्यावर संदीप देशपांडे यांनी काय म्हटलं आहे : 

“आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करत असताना हात उचलणारे पोलीस आम्ही पाहिले. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होते. सरकारचे दलाल असल्यासारखं पोलिसांनी वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते…पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढा माज दाखवू नका. पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये. एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा….मग आम्ही दाखवतो राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ते…जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते गोंधळ घालणार असल्याची पोलिसांना कुणकूण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांना आधीत ताब्यात घेतलं होतं. तरी पोलिसांची नजर चुकवून दोन कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. 


Post a Comment

0 Comments